मृत्यू पत्र


मी नामे रणजीत विक्रम सुर्यवंशी उर्फ रणजीत मिराबाई विक्रम सुर्यवंशी राहणार मु. पो. खरजई ता. चाळीसगाव जि. जळगाव वय २७ व्यवसाय ______ 
माझ्या सहखुशीने, मर्जीने व पुर्ण शुध्द अवस्थेत खालील नमूद अटींप्रमाणे माझे मृत्यू पत्र लिहून देत आहे.

१)  भविष्यामध्ये मी (जीवंत) नसतांना माझ्या सर्व संपत्तीची विभागणी ९०% आणि १०या प्रमाणे करुन  ९०संपत्तीची रक्कम (बॅंक बॅलेंस, जमिन, फ्लॅटस्, चल-अचल व इतर तत्सम संपत्ती इ.) ही माझ्या प्रियजनांना माझ्या डायरीमध्ये माझ्या अक्षरात लिहून ठेवल्याप्रमाणे व उरलेली १०% संपत्तीची रक्कम ही अन्न, वस्त्र व निवारा नसलेल्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे वाटण्याचा अधिकार फक्त आणि फक्त माझ्या बहीणी विजयालक्ष्मी विक्रम सुर्यवंशी उर्फ सौ. विजयालक्ष्मी हेमंत पाटील राहणार चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव व विदया विक्रम सुर्यवंशी उर्फ सौ. विदया जितेंद्र शिरसाठ राहणार मुल्हेर ता. सटाणा जि. नाशिक व माझी पत्नी सौ. कविता रणजीत सुर्यवंशी यांच्याकडेच असेल.

२)      अ. क्र. १ मध्ये नमुद केलेली अट काही कारणास्तव ६ महीन्यात पुर्ण नाही करु शकले तर सदर अधिकार हा माझा मोठा भाऊ श्री. विनोद विक्रम सुर्यवंशी राहणार खरजई ता. चाळीगाव जि. जळगाव हल्ली मुक्काम धुळे ता. धुळे जि. धुळे याच्याकडे असेल परंतू संपत्तीचा विभागणी ही अ. क्र. १ प्रमाणेच करावी लागेल.

३)    सदर संपत्तीची विभागणी ही घरातील सर्व लोकांसमोर व गावातील ५ (पाच) प्रतिष्ठीत व्यक्तींसमोर करण्यात यावी.

४)      क्रमश:


सदर मृत्यु पत्रात वेळेवेळी आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो

Last Update दिनांक १२  नोव्हेंबर २०१७